एकादशी उपवास
मानवी शरीराला अन्न, पाणी, प्राण आणि ब्रम्हांडाकडून ऊर्जा प्राप्त होत असतात. अन्न आणि पाणी फक्त हेच आपल्या ऊर्जेचे स्त्रोत आहेत अशा गैरसमजामुळे ब्रम्हांडातील सूक्ष्म अध्यात्मिक ऊर्जा सामावून घेण्यास आपण अपयशी ठरतो.
काही विशिष्ट दिवशी उपवास केल्याने आपल्याला या शुद्ध ऊर्जा मिळवता येतात. तसेच प्राणायाम आणि ध्यान यासारख्या अध्यात्मिक पद्धती ह्या रिकाम्या पोटी जास्त प्रभावी होतात हे ही अगदी बरोबर आहे.
एकादशी म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्येनंतरचा अकरावा दिवस आणि त्यानुसार प्रत्येक महिन्याला दोन एकादश्या असतात. एकादशी हा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि उपवास करण्यासाठी सर्वात योग्य दिवस आहे.
मानवी शरीराला अन्न, पाणी, प्राण आणि ब्रम्हांडाकडून ऊर्जा प्राप्त होत असतात. अन्न आणि पाणी फक्त हेच आपल्या ऊर्जेचे स्त्रोत आहेत अशा गैरसमजामुळे ब्रम्हांडातील सूक्ष्म अध्यात्मिक ऊर्जा सामावून घेण्यास आपण अपयशी ठरतो. काही विशिष्ट दिवशी उपवास केल्याने आपल्याला या शुद्ध ऊर्जा मिळवता येतात. तसेच प्राणायाम आणि ध्यान यासारख्या अध्यात्मिक पद्धती ह्या रिकाम्या पोटी जास्त प्रभावी होतात हे ही अगदी बरोबर आहे.
उद्देश
शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी मनाचे शुद्धीकरण आणि कोषांची बळकटी आवश्यक असते.
प्रक्रिया
आठ ते ऐंशी वयोगटातील कोणीही व्यक्ती हा उपवास करू शकते. डाळी, धान्य, मांसाहार आणि दूषित पदार्थ हे टाळले पाहिजेत. कच्ची फळं आणि भाज्या घेता येतात. हळूहळू एखादी व्यक्ती पूर्ण उपवासाच्या अवस्थेमध्ये म्हणजे पाणी ही वर्ज्य करून राहू शकते. एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छाशक्तीच्या आधारावर जास्त ताण आणू न देता उपवास करण्याचा प्रयत्न करू शकते. तथापि आजारी लोक आणि गर्भवती महिलांनी उपवास करू नये अशी दक्षता घ्यावी.
मार्गदर्शक तत्त्वे
उपवासाबरोबरच जर मौन व्रत पाळले तर अधिक फायदेशीर ठरते.
उपवास करताना कोणी ओम ध्यानाचा सराव करू शकतो. ह्यामुळे शरीराची आणि मनाची ऊर्जा पातळी राखण्यास मदत होते. दिवसभर त्या परमात्म्याशी जोडलेले रहाण्यास सुद्धा हे मदत करते.
आठ ते ऐंशी वयोगटातील कोणीही व्यक्ती हा उपवास करू शकते. डाळी, धान्य, मांसाहार आणि दूषित पदार्थ हे टाळले पाहिजेत. कच्ची फळं आणि भाज्या घेता येतात. हळूहळू एखादी व्यक्ती पूर्ण उपवासाच्या अवस्थेमध्ये म्हणजे पाणी ही वर्ज्य करून राहू शकते. एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छाशक्तीच्या आधारावर जास्त ताण आणू न देता उपवास करण्याचा प्रयत्न करू शकते. तथापि आजारी लोक आणि गर्भवती महिलांनी उपवास करू नये अशी दक्षता घ्यावी.
फायदे
एकादशीचा उपवास नियमित केल्याने आपल्याला खालील शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक फायदे होतात.
शरीराची पूर्णपणे दुरूस्ती आणि शरीराला टवटवीत करण्यासाठी.
शरीरात असलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी.
मनाची संपूर्ण विश्रांती आणि शुद्धिकरण होण्यासाठी
वाईट विचार पुसून टाकण्यासाठी.
झोपेचे विकार दूर करण्यासाठी.
इच्छाशक्ती आणि आंतरिक शक्तीची वाढ होण्यासाठी.
वासना आणि राग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी.
आत्मसाक्षात्कार लवकर साधण्यासाठी आपल्या साधनेला चालना देणे.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...