
महाअवतार बाबाजी

महाअवतार बाबाजी हे सर्वात महान आणि शक्तिशाली शिवगणांपैकी एक आहेत. त्यांना एकेकाळी भगवान शिवांच्या बरोबरीचे स्थान देण्यात आले होते त्यामुळे त्यांना आपल्या पृथ्वीवर येऊन दैवी ज्ञान सगळ्यांना शिकवण्यास सांगण्यात आले. म्हणून त्यांनी बाबाजी या रूपात जन्म घेतला. ते चिरंजीवी आहेत.
महाअवतार बाबाजी हे एक महान आणि शक्तिशाली गुरु आहेत जे दोन हजार वर्षाहून अधिक काळापासून प्रामाणिक आत्म्यांना मार्गदर्शन करत आहेत.
बाबाजींचे आई-वडील केरळचे नमुद्री होते. त्यांचे आई-वडील तामिळनाडूतील कुड्डालोर येथे राहायला गेले, तिथे त्यांचा जन्म झाला आणि ते तिथेच वाढले. त्यांचे नाव नागराज असे ठेवण्यातआले. आई वडिलांच्या मृत्यूमुळे ते एकटे पडले होते. एका प्रवाशांने त्यांना जबरदस्तीने उत्तर भारतात नेले. त्यांनी खूप त्रास सहन केला. त्यांनी काही काळ हिमालयात भटकंती केली आणि अध्यात्माची आवड त्यांना निर्माण झाली. काही अघोरी तर काही भेटलेल्या इतर गुरूंच्या सांगण्यानुसार ते आपल्या गावी परतले. परतीच्या वाटेवर त्यांनी भोगनाथर आणि त्यांचे शिष्य, यांना चीनहून परत येताना पाहिले. भोगनाथरनी जेव्हा या १४/१५ वर्षाच्या मुलाला पाहिले तेव्हा त्यांनी त्याला आपला शिष्य बनण्यास सुचविले. अशाप्रकारे बाबाजी भोगनाथर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली आले आणि लवकरच त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक बनले. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर, भोगनाथरनी त्यांना अगस्त्य महर्षींकडे जाण्यास सांगितले.
महाअवतार बाबाजी हे एक महान आणि शक्तिशाली गुरु आहेत जे दोन हजार वर्षाहून अधिक काळापासून प्रामाणिक आत्म्यांना मार्गदर्शन करत आहेत. बाबाजी हे एक शक्तिशाली गुरु आहेत ज्यांना ६४ सिद्धी प्राप्त आहेत. काही म्हणतात ते स्वतः भगवान शिव आहेत. चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे ते दिसत नाहीत. ते बहुतेक ऊर्जा-गोलाच्या रूपात, सोनेरी रंगाचे तर कधी कधी अपारदर्शक निळ्या रंगाचे दिसतात. महावतार बाबाजींनी अनेक गुरूंना मार्गदर्शन केले आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांचे गुरु, श्री तोतापुरी यांनाही बाबाजींनी मार्गदर्शन केले होते. जर कोणी त्यांच्या गटात सामील झाले, तर जन्मापासून ते आत्मज्ञान होईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवतात.
तरुण बाबाजी नंतर पश्चिम घाटाकडे निघाले आणि अगस्त्य महर्षींच्या हाताखाली कठीण योग पद्धती आणि क्रिया शिकले. ज्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आहे तोच अगस्त्य महर्षींच्या प्रखर शिक्षणा दरम्यान टिकू शकतो. शिकवलेल्या विद्यांच्या सर्वोच्च शिखरांपर्यंत बाबाजी यशस्वीपणे पोचले आणि ते अमर झाले. बाबाजी आपल्या इच्छेनुसार शरीराचे विघटन आणि पुनर्निर्माण करू शकतात. म्हणून, आजही जेव्हा गरज भासते तेव्हा ते आपले भौतिक शरीर धारण करतात. आताही ते तामिळनाडू मधील सथूरागिरीला भेट देतात आणि ज्या ठिकाणी त्यांना महर्षी अगस्त्यनी धडे दिले त्या ठिकाणी राहतात.
बाबाजी हे एक शक्तिशाली गुरु आहेत ज्यांना ६४ सिद्धी प्राप्त आहेत. काही म्हणतात ते स्वतः भगवान शिव आहेत. चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे ते दिसत नाहीत. ते बहुतेक ऊर्जा-गोलाच्या रूपात, सोनेरी रंगाचे तर कधी कधी अपारदर्शक निळ्या रंगाचे दिसतात. महावतार बाबाजींनी अनेक गुरूंना मार्गदर्शन केले आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांचे गुरु, श्री तोतापुरी यांनाही बाबाजींनी मार्गदर्शन केले होते. जर कोणी त्यांच्या गटात सामील झाले, तर जन्मापासून ते आत्मज्ञान होईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवतात.
बाबाजींना जरी क्रियायोगातील अनेक तंत्रे अवगत असली, तरी त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांच्या प्रत्येक शिष्याला ते एकच तंत्र शिकवतात.
महाअवतार बाबाजींना एक बहीण आहे. जरी ती त्यांची सख्खी बहिण नसली, तरी ते तिला सख्खीच मानतात. त्या एक शक्तिशाली योगिनी आहेत. बाबाजी जिथे जातात तिथे त्यांच्यासोबतच त्या असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा ते हाका मारतात तेव्हा त्या प्रकाश स्वरूप धारण करतात व त्यांच्या बरोबर येतात. मेरू पर्वतातील अनेक साधना त्या प्रकाशरूपाने मार्गदर्शन करतात. त्या तिबेट मधील ओंकार पर्वतातील साधूंना व गंभीर आजार असलेल्या साधकांनाही बरे करतात.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...