अगस्त्य महर्षी | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

अगस्त्य महर्षी


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

अगस्त्य महर्षी हे भगवान शंकरांच्या प्रत्यक्ष शिष्यांपैकी एक होते. पूर्वीच्या तिबेटमधील हे महर्षी सिद्धामध्ये प्रथम आणि प्रमुख म्हणून पूज्य आहेत. ललिता सहस्रनाम हे जेव्हा जगामध्ये प्रथम प्रकट झाले तेव्हा भगवान विष्णुचे रुप हयग्रीव यांनी अगस्त्य महर्षीना ते शिकवले. त्यांनी 'आदित्य हृदयम' हे भगवान सूर्यनारायणाचे स्तोत्र रचले जे भगवान रामांना रावणाशी युद्धाच्या अगोदर शिकवले गेले. तामिळ भाषेच्या व्याकरणाचा पाया त्यांच्या 'अगत्थियम' या पुस्तकाद्वारे घातल्याचे श्रेयही त्यांना दिले जाते.

अगस्त्य महर्षींचे योगदान हे विशाल व वैविध्यपूर्ण आहे. त्यांना योगशास्त्रात अग्रगण्य मानले जाते, तसेच वैद्यकशास्त्र व ज्योतिषशास्त्र त्यातही नाडीशास्त्र, यातही त्यांचे भरीव योगदान आहे. ते निपुण किमयागार आहेत. अगस्त्य संहिता हा भगवान मुरूग आणि अगस्त्य महर्षी यांच्यातील संवाद आहे. अनेक पुराणात आणि इतिहासात ते प्रकट झाले आहेत. त्यांची एक औषधी योजना इतकी प्रभावशाली आहे की ती मृत झालेल्या व्यक्तीलाही पुन्हा जीवन देऊ शकते. त्यांनी कावेरी नदीच्या जन्माच्यावेळी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती, तसेच असुरांना पकडण्यासाठी त्यांनी संपूर्ण समुद्राचे प्राशन केले होते.

अगस्त्य महर्षी हे कलरीपयाट्टू ह्या युद्ध कलेचे पहिले प्रवर्तक मानतात आणि ह्या प्रकाराचा आजही केरळ व तामिळनाडू मधील काही भागात सराव केला जातो. भारतातील दक्षिण भागात महर्षीचे योगदान हे अभूतपूर्व मानले जाते. अगस्त्य महर्षींनी अरुणाचल पर्वतावर भरपुर शक्ती ठेवल्या आहेत आणि ते भगवान शंकरांचे निवासस्थान म्हणून खुप शक्तिशाली बनवले.

पुराणानुसार, भगवान शंकर व देवी पार्वतीच्या विवाह सोहळ्याच्या वेळी भगवतांनी अगस्त्य महर्षींना दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. त्यांनी जरी ६४ सिद्धिंमध्ये प्राविण्य मिळवले होते तरीही ते उत्तरेपासून दक्षिणेकडे चालत गेले व ह्या प्रवासात अनेक चमत्कार ही केले. वाटेत जाताना, असे लिहिले आहे की इर्षेपोटी हिमालयाशी स्पर्धा करताना विंध्य पर्वत उंच उंच होत गेला. अगस्ती ऋषींनी विंध्याला सांगितलं की तो जोपर्यंत परत उत्तरेकडे येत नाही तोपर्यंत त्यानी नतमस्तक रहावे व असा करारही केला आणि आजपर्यंत विंध्य पर्वत तसाच नतमस्तक राहिला आहे. अगस्त्य महर्षी देखील विंध्य पर्वताच्या पातळीपर्यंत उंच झाले, त्यांनी आपल्या शक्तिशाली ऊर्जेने वरचा भाग कापून दक्षिण भारतात तिरुवन्नमालाई येथे आणून ठेवला.

अगस्त्य महर्षी हे कलरीपयाट्टू ह्या युद्ध कलेचे पहिले प्रवर्तक मानतात आणि ह्या प्रकाराचा आजही केरळ व तामिळनाडू मधील काही भागात सराव केला जातो. भारतातील दक्षिण भागात महर्षीचे योगदान हे अभूतपूर्व मानले जाते. अगस्त्य महर्षींनी अरुणाचल पर्वतावर भरपुर शक्ती ठेवल्या आहेत आणि ते भगवान शंकरांचे निवासस्थान म्हणून खुप शक्तिशाली बनवले.

असेही मानले जाते की अगस्त्य महर्षींनी महावतार बाबाजींना काही सिद्धी व क्रिया शिकवल्या. त्यांना थिरूमूलर यांच्या अनेक गुरूंपैकी गुरु मानले जाते. त्यांची महानता हीच की त्यांच्या योगदानाच्या तुलनेत ते शारीरिक उंचीने फक्त लहान वाटू शकतात.