गुरुजी कृष्णानंद

गुरुजी म्हणजे पवित्रता आणि प्रेमाचे मूर्त स्वरूप.कोणीही त्यांच्या बोलण्याशी आणि दिसण्याशी देवत्वाचा संबंध जोडू शकतो. आम्ही त्यांना गुरुजी असे संबोधत होतो. ते आम्हा सगळ्यांचे वडील होते, आई होते, मित्र पण होते व जे कोणी त्यांच्या संपर्कात आले त्यांचे ते मार्गदर्शक ही होते. धार्मिक वृत्तीच्या माता पित्यांच्या पोटी १८ मे १९३९ रोजी त्यांचा जन्म झाला. ते चांगुलपणा, प्रामाणिकपणा दयाळू वृत्ती आणि सहानुभूती हे गुण घेऊनच मोठे झाले.
संगीत, कला, साहित्य याकडे गुरुजींचा कल होता. जगामध्ये जी असंवेदनशीलता होती, ती त्यांना मान्य नव्हती. खोलवर त्यांना एक आदर्श जग निर्माण करण्याची इच्छा होती, जे प्रकाशमय आणि प्रेमाने भरलेले असेल. गुरुजी सामान्य गृहस्थ जीवन जगत होते, पण त्यांना सतत एका अशा व्यक्तीचा शोध होता की जो त्यांच्या चांगले जग निर्माण करण्याच्या भावना समजू शकला असता.
वयाच्या ३८ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांना त्यांचे गुरु महर्षी अमरा भेटले. यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. अमरांनी गुरुजींना, ऋषी-मुनी, दैवी व्यक्तिमत्वे, उच्च मिती आणि अनेक न ऐकलेल्या वास्तवांशी ओळख करून दिली. जेव्हा अमरांनी एका अध्यात्मिक प्रकल्पासाठी काम करायला बोलावले तेव्हा गुरुजींनी त्यांना लगेच बिनशर्त पाठिंबा दिला.
गुरुजी म्हणजे पवित्रता आणि प्रेमाचे मूर्त स्वरूप.कोणीही त्यांच्या बोलण्याशी आणि दिसण्याशी देवत्वाचा संबंध जोडू शकतो. आम्ही त्यांना गुरुजी असे संबोधत होतो. ते आम्हा सगळ्यांचे वडील होते, आई होते, मित्र पण होते व जे कोणी त्यांच्या संपर्कात आले त्यांचे ते मार्गदर्शक ही होते. २३ नोव्हेंबर २०१२ रोजी आपले पार्थिव शरीर त्यागले. गुरुजींना सूक्ष्म स्तरावर प्रामाणिकपणे शोधणाऱ्या सर्वांना ते मार्गदर्शन करतात. त्यांचा वारसा त्यांच्या शिकवणीद्वारे व समर्पित अशा शिष्यांच्याद्वारे पुढे चालु आहे.
गुरुजींनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि १९८१ मध्ये अमरांच्या प्रकल्पात ते सामील झाले. मात्र १९८२ मध्ये अमरांच्या निधनाने ते पुन्हा एकाकी झाले. कठीण परिस्थितीचा सामना करत १९८८ पासून त्यांनी ध्यान शिकवण्यास सुरुवात केली. एक एक वीट रचून त्यांनी ऋषींचा प्रकल्प उभा केला.
गुरूजी कधीही त्यांच्या सूक्ष्म पातळीवरील कार्याबद्दल फारसे बोलत नसत. त्यांच्या साध्या दिसण्यामागे त्यांचे मोठेपण लपले जाई. ते स्वतःपेक्षा अमरा आणि ऋषी यांच्या बद्दल अधिक बोलत. ते त्यांच्या सूक्ष्म स्तरावरील कार्य व भौतिक प्रकल्पांमध्ये रात्रंदिवस व्यस्त असत. पृथ्वीवर दुसरी शंबला स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न होते.
२३ नोव्हेंबर २०१२ रोजी आपले पार्थिव शरीर त्यागले. गुरुजींना सूक्ष्म स्तरावर प्रामाणिकपणे शोधणाऱ्या सर्वांना ते मार्गदर्शन करतात. त्यांचा वारसा त्यांच्या शिकवणीद्वारे व समर्पित अशा शिष्यांच्याद्वारे पुढे चालु आहे.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...